उदास सैरभैर मनाला सावरायला, गवतात जरा जाऊन बसले.
कशा प्रकारची माणसं भेटतात, त्याचा विचार करत राहिले. ||
समोर छोटंसं तळ होतं, कानात गुलजारचं गाणं होतं.
मनात द्वन्द्व सुरु होतं, खूप चांगलं असणं काही बरं नव्हतं. ||
मागून इवलेशे दोन कान झाडीतून डोकावत होते.
माझी शांती भंगू नये म्हणून शांतपणे ऐकत होते. ||
त्यांच्या सारखे सगळेच लोक असते तर?
नको तिथे हक्काने लुडबुडणारे नसते तर? ||
काहीना सवय असते, धांदात खोटं बोलायची
काही काम न करता, खूप काही दाखवायची. ||
काहीमध्ये कौशल्य असते, काम करून घेण्याचं.
गोड बोलून दुसऱ्यांना मनासारखं वागायला लावायचं. ||
काही लोक नुसतेच पाहतात, किनाऱ्यावरून अंदाज घेतात.
योग्य वेळ येताच, आपलं सगळं साधवून घेतात. ||
आणि काही माझ्यासारखे, काम करून निव्वळ मरतात.
आणि नंतर त्याच्या श्रेयासाठी खुळचट भांडत बसतात. ||
विश्वास कुणावर ठेवावा, याचाच डोक्यात गोंधळ उडतो.
आपलं आपलं ज्याला म्हणावं, त्यांच्याकडूनच भ्रमनिरास होतो. ||
खरंच! खोटं न बोलणं एवढं अवघड आहे का?
परिस्थितीचा फायदा न घेता जगणं अगदीच अशक्य आहे का? ||
तूच सांग मला त्या लपलेल्या हरिणा?
काय बरोबर आणि काय चुकीचं?
माझं सरळ वागणं की त्यांचं समजून अज्ञान पांघरणं? ||
MARATHI BLOG,FUN,LIFE,COMEDY,LITERATURE,NOVEL,STORY,CONVERSATION, THOUGHTS,BOOKS,POEMS,DREAMS,IMAGINATION AND LOT MORE....
शनिवार, ८ ऑक्टोबर, २०११
रविवार, २८ ऑगस्ट, २०११
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११
भ्रष्टाचार
लहानपणीची एक गोष्ट आठवली. उन्हाळ्याच्या सुट्टीत, झोपण्याआधी माझ्या आजोबांना, आम्ही ७-८ नातवंडे गोष्टीसाठी आग्रह धरत असू. नेहमी ते चांगली गोष्ट सांगत. पण कधी त्यांना कंटाळा आला असेल तेव्हा त्यांची गोष्ट अशी चालू होत असे.
"एकऽऽऽ होता राजा. काय होता?"
"राजाऽऽऽ" आम्ही पिलावळ ओरडत असू.
"मगऽऽऽऽऽ एक होता?"
"राजाऽऽऽ"
"आणि ऽऽऽऽऽऽऽ एक होता राजा"
मग आम्ही नातवंडे चिडत असू. पण ती गोष्ट कधीच संपत नसे. फिरून फिरून ती पून्हा "एक होता राजा" वरच येत असे. 'अण्णा हजारे ऑगस्ट मध्ये पून्हा उपोषण सुरु करणार' ही बातमी वाचून मला ही गोष्ट आठवली. या भ्रष्टाचाराचंही तसंच नाही का? तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक? कसाही असला तरी भ्रष्टाचार जगाला नवीन नाही. लालच हा मनुष्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आदिमानवाने ही कशाच्यातरी स्वरूपात, कुणालातरी लाच दिलीच असेल.
जगभरात आपल्याला त्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. अमेरिकेत Watergate scandal पायी प्रेसिडेंट Nixon ना राजीनामा द्यावा लागला होता. बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींचे नाव गुंतले गेले होते. सुरेश कलमाडींना Commonwealth Games च्या अफरातफरीमध्ये जेल मध्ये सुद्धा टाकलंय. अफगाणिस्तान मधले सरकार तर एवढं भ्रष्ट आहे की त्याची वर्तमानपत्रात दररोज नवीन बातमी असते. Rupert Murdoch सारख्या powerful माणसाच्या अनेक कंपन्यांनी, त्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने, अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून रॉयल कुटुंबालाही धाकात ठेवले होते. याच ब्रिटिशांनी, तेव्हाच्या भारतातल्या छोट्या मोठ्या राजांना लालच दाखवूनच भारतावर कब्जा केला होता. आज आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय पण भ्रष्टाचारापासून कुठे मिळालंय? उलट स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार वाढतच चाललाय!
जन लोकपाल विधेयकामुळे IAC (India Against Corruption) च्या नेत्यांना, भ्रष्टाचारासाठी कुणावरही, अगदी पंतप्रधानांवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. गेले ४२ वर्षे त्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली नाही, याचा अर्थ इतकी वर्षे आपल्याकडे राज्यसभेत निम्म्यापेक्षा जास्त नेते भ्रष्ट आहेत असा आपण घ्यायचा का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनसाठी domicile certificate घेताना किती नाकीनऊ येते हे आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म, मृत्यूचा दाखला घेतानाही तुम्हाला लाच द्यावी लागते. या भ्रष्टाचारामुळे कितीतरी NRI लोकांना भारतात परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध बंड करण्याची हीच वेळ योग्य नाही का? जेव्हा जगभर सोशल मेडिया द्वारे अन्यायाविरुद्ध उठाव होत आहेत, ज्याच्यामुळे तरुण वर्गाला पटकन त्यांचे मत मांडण्यास, संघटना स्थापन करण्यास वाव मिळत आहे. त्या औद्योगिक क्रांती (Technological Revolution) च्या युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंनी पूर्वीही उपोषणे केली होती, पण एप्रिल मधल्या त्यांच्या उपोषणाला, जसा संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला होता तसा पूर्वी नव्हता मिळाला. Facebook मुळे निमिषार्धात हजारो लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.
एवढं सगळं झालं तरी, जन लोकपाल विधेयक भक्कम करण्याकरता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जमलेले समाजसेवक आणि सरकार यांच्यामध्ये जूनमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली नाही. तेव्हा अण्णा हजारेंनी ऑगष्ट मध्ये पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. बघूया त्याचे काय होते ते? भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होणार्या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे? कदाचित शिक्षेपेक्षा, भर समाजात झालेल्या त्या अपमानाने लोकांवर थोडा वाचक बसेल!
थोडक्यात लाच देणे घेणे ही सहज सोपी गोष्ट नसून तो एक गुन्हा आहे; हेच सामान्य माणसाच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या दुर्दैवाने, गणपतीने जसा, पृथ्वीला फेरा घालण्याऐवजी, स्वतःच्या आईवडीलांना फेरा घालून पैज जिंकली होती, तसा काही शोर्टकट आपल्याजवळ नाही. पण अण्णांची लढाई अगदी गणपती येण्याच्या तोंडावर सुरु होतेय, तेव्हा बघूया विघ्नहर्ता गणपती काही मदत करतोय का?
पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यावर पोलिसाने पकडल्यावर १०० रुपयात काम नाही झाले म्हणून तुम्हीच तक्रार करू नका म्हणजे झाले!
"राजाऽऽऽ" आम्ही पिलावळ ओरडत असू.
"मगऽऽऽऽऽ एक होता?"
"राजाऽऽऽ"
"आणि ऽऽऽऽऽऽऽ एक होता राजा"
मग आम्ही नातवंडे चिडत असू. पण ती गोष्ट कधीच संपत नसे. फिरून फिरून ती पून्हा "एक होता राजा" वरच येत असे. 'अण्णा हजारे ऑगस्ट मध्ये पून्हा उपोषण सुरु करणार' ही बातमी वाचून मला ही गोष्ट आठवली. या भ्रष्टाचाराचंही तसंच नाही का? तो सुरू तर होतो, पण त्याचा शेवट कधी दिसेल कुणास ठाऊक? कसाही असला तरी भ्रष्टाचार जगाला नवीन नाही. लालच हा मनुष्याच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आदिमानवाने ही कशाच्यातरी स्वरूपात, कुणालातरी लाच दिलीच असेल.
जगभरात आपल्याला त्याची कितीतरी उदाहरणे सापडतात. अमेरिकेत Watergate scandal पायी प्रेसिडेंट Nixon ना राजीनामा द्यावा लागला होता. बोफोर्स प्रकरणामध्ये राजीव गांधींचे नाव गुंतले गेले होते. सुरेश कलमाडींना Commonwealth Games च्या अफरातफरीमध्ये जेल मध्ये सुद्धा टाकलंय. अफगाणिस्तान मधले सरकार तर एवढं भ्रष्ट आहे की त्याची वर्तमानपत्रात दररोज नवीन बातमी असते. Rupert Murdoch सारख्या powerful माणसाच्या अनेक कंपन्यांनी, त्यांच्या भ्रष्ट कार्यशैलीने, अगदी ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून रॉयल कुटुंबालाही धाकात ठेवले होते. याच ब्रिटिशांनी, तेव्हाच्या भारतातल्या छोट्या मोठ्या राजांना लालच दाखवूनच भारतावर कब्जा केला होता. आज आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय पण भ्रष्टाचारापासून कुठे मिळालंय? उलट स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचार वाढतच चाललाय!
जन लोकपाल विधेयकामुळे IAC (India Against Corruption) च्या नेत्यांना, भ्रष्टाचारासाठी कुणावरही, अगदी पंतप्रधानांवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळू शकतो. गेले ४२ वर्षे त्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली नाही, याचा अर्थ इतकी वर्षे आपल्याकडे राज्यसभेत निम्म्यापेक्षा जास्त नेते भ्रष्ट आहेत असा आपण घ्यायचा का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनसाठी domicile certificate घेताना किती नाकीनऊ येते हे आपल्याला माहीत आहे. अगदी जन्म, मृत्यूचा दाखला घेतानाही तुम्हाला लाच द्यावी लागते. या भ्रष्टाचारामुळे कितीतरी NRI लोकांना भारतात परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याच्या विरुद्ध बंड करण्याची हीच वेळ योग्य नाही का? जेव्हा जगभर सोशल मेडिया द्वारे अन्यायाविरुद्ध उठाव होत आहेत, ज्याच्यामुळे तरुण वर्गाला पटकन त्यांचे मत मांडण्यास, संघटना स्थापन करण्यास वाव मिळत आहे. त्या औद्योगिक क्रांती (Technological Revolution) च्या युगाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंनी पूर्वीही उपोषणे केली होती, पण एप्रिल मधल्या त्यांच्या उपोषणाला, जसा संपूर्ण भारतातून प्रतिसाद मिळाला होता तसा पूर्वी नव्हता मिळाला. Facebook मुळे निमिषार्धात हजारो लोकांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता.
एवढं सगळं झालं तरी, जन लोकपाल विधेयक भक्कम करण्याकरता, अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली जमलेले समाजसेवक आणि सरकार यांच्यामध्ये जूनमध्ये झालेली चर्चा यशस्वी झाली नाही. तेव्हा अण्णा हजारेंनी ऑगष्ट मध्ये पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. बघूया त्याचे काय होते ते? भ्रष्टाचाराचे निर्मुलन करणे इतके सोपे नाही. इंग्रजांना देशाबाहेर काढण्यास जवळजवळ १०० वर्षे लागली. ते तरी परकीय होते. हा भ्रष्टाचार आपल्यातलाच आहे. ती माणसाचीच एक प्रवृत्ती आहे, एक विकार आहे. त्याचे पूर्णत: निर्मुलन करणे शक्य नाही, पण ते नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. भारतात नसबंदी, पोलिओच्या मोहिमा जशा देशभर राबवल्या जातात, तसेच काहीसे भ्रष्टाचाराबाबतही सरकारने करायला हवे. जेव्हा गावा गावात भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि तो आढळल्यास होणार्या शिक्षेची जाहिरात होईल तेव्हा सर्वसामान्य नागरिकही जागृत होईल. टि. व्ही वर शाहरुख खान, अमिताभ बच्चन येऊन त्याच्याबद्दल सांगू लागतील तेव्हा त्यांचे अनुयायीही त्याचे अनुकरण करतील. भ्रष्ट लोकांना, बाबा रामदेव म्हणतात तसे एकदम फाशी देणे शक्य नाही, पण अण्णा हजारेंनी , दारुड्या लोकांना अद्दल घडविण्यास राळेगण सिद्धीत केले, तसे भर रस्त्यावर खांबाला बांधून ठेवायला काय हरकत आहे? कदाचित शिक्षेपेक्षा, भर समाजात झालेल्या त्या अपमानाने लोकांवर थोडा वाचक बसेल!
थोडक्यात लाच देणे घेणे ही सहज सोपी गोष्ट नसून तो एक गुन्हा आहे; हेच सामान्य माणसाच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या दुर्दैवाने, गणपतीने जसा, पृथ्वीला फेरा घालण्याऐवजी, स्वतःच्या आईवडीलांना फेरा घालून पैज जिंकली होती, तसा काही शोर्टकट आपल्याजवळ नाही. पण अण्णांची लढाई अगदी गणपती येण्याच्या तोंडावर सुरु होतेय, तेव्हा बघूया विघ्नहर्ता गणपती काही मदत करतोय का?
पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यावर पोलिसाने पकडल्यावर १०० रुपयात काम नाही झाले म्हणून तुम्हीच तक्रार करू नका म्हणजे झाले!
बुधवार, ३० मार्च, २०११
पप्पांचे मोर!
मोरपिसांचा गुच्छ घेऊन तुम्ही आलात
मी अत्यानंदाने ओरडले
'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर!' तुम्ही म्हणालात.
मग मोरांच्या झुंडी कशा आल्या,
आणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:
याच वर्णन तुम्ही केलंत.
'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.
हे कितीतरी दिवस चाललं
पण तो उद्या कधीच नाही उजाडला...
आणि आता तुम्हीच नाही राहिलात
मोर पाहायला घेऊन जायला.
त्यावेळी जर मी आले असते तर!
तुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर!
त्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख
माझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले
आता ते मोर मला पाहायचेच होते,
तो रस्ता मला तुडवायचाच होता.
ज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले
त्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.
मग आम्ही निघालो.
संध्याकाळच्या सहा वाजता.
कुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.
सगळा ओढा पालथा घातला.
तुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.
मग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला
आणि आम्ही पळालो
काट्याकुट्यातून, चिखलातून.
सगळे बेभान होऊन.
मोर मोर..पप्पांचे मोर!
शरीरातला कण न कण गात होता.
वरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.
सारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.
आणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.
तुमच्यासारखाच!
खूप रडू आलं.
मोर न पाहता जायचं जीवावर आलं.
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत
हे नुकतंच कुठं शिकलो होतो.
रडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.
आणि त्याच वेळी आमच्या समोरून
डौलात एक मोर आणि मोरणी येत होती.
पप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती?
पुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,
त्या मोरांना बघायला जायचं,
कधीच चुकवणार नाही मी आता.
मी अत्यानंदाने ओरडले
'पहाटे सहा वाजता यावे लागेल, तुलाही पाहायची असतील तर!' तुम्ही म्हणालात.
मग मोरांच्या झुंडी कशा आल्या,
आणि पिसारा फुलवून तुमच्यासमोर ते नाचू कसे लागले:
याच वर्णन तुम्ही केलंत.
'उद्या नक्कीच' पिसांकडे झेपावत मी म्हणाले.
हे कितीतरी दिवस चाललं
पण तो उद्या कधीच नाही उजाडला...
आणि आता तुम्हीच नाही राहिलात
मोर पाहायला घेऊन जायला.
त्यावेळी जर मी आले असते तर!
तुमच्यासोबत काही क्षण घालवले असते तर!
त्या अविस्मरणीय आठवणींना मुकल्याचे दु:ख
माझ्या इवल्याश्या शरीरात मावेनासे झाले
आता ते मोर मला पाहायचेच होते,
तो रस्ता मला तुडवायचाच होता.
ज्या मोरांना त्या डोळ्यांनी बेभान होऊन पहिले
त्या मोरांना माझ्या डोळ्यात कायमचे कोरून ठेवायचेच होते.
मग आम्ही निघालो.
संध्याकाळच्या सहा वाजता.
कुणी म्हणाले मोर तेव्हाही येतात.
सगळा ओढा पालथा घातला.
तुमच्यासारखाच मोरही आमच्यावर रुसून बसला होता.
मग दूरवर कुठेतरी मोराचा डौलदार तुरा दिसला
आणि आम्ही पळालो
काट्याकुट्यातून, चिखलातून.
सगळे बेभान होऊन.
मोर मोर..पप्पांचे मोर!
शरीरातला कण न कण गात होता.
वरून दिव्य संधिप्रकाश पाझरत होता.
सारा आसमंत आमच्याबरोबर जणू तेच म्हणत होता.
आणि अचानक तो मोर आमच्या डोळ्यासमोरच अदृश्य झाला.
तुमच्यासारखाच!
खूप रडू आलं.
मोर न पाहता जायचं जीवावर आलं.
पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत
हे नुकतंच कुठं शिकलो होतो.
रडत रडत परतीच्या वाटेवर लागलो होतो.
आणि त्याच वेळी आमच्या समोरून
डौलात एक मोर आणि मोरणी येत होती.
पप्पा, तुम्हीच तर ती पाठवली नव्हती?
पुनर्जन्मावर माझाही विश्वास बसलाय आता,
त्या मोरांना बघायला जायचं,
कधीच चुकवणार नाही मी आता.
गुरुवार, १० मार्च, २०११
फेसबुक
गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!
अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!
अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!
शुक्रवार, २१ जानेवारी, २०११
The Good and The Great!
परवा मला माझ्या एका मित्राचा इमेल आला. त्याने लिहिले होते - "तुझे काय चाललेय? इकडे आम्ही ओबामा बरोबर वेळ घालवतोय." त्यावेळी मी ते हसून घालवले. पण नंतर मनात विचार आला. हा माझा मित्र सातार्यात राहणारा. अमेरिकेचा राष्ट्रपती, कुठेतरी दिल्लीत आलाय, तरीही हा त्याच्या भेटीत किती सहभागी आहे. भारतातल्या सगळ्यांना तसंच वाटत असेल यात मला शंका नव्हती. २००० मध्ये झालेल्या प्रेसिडेंट क्लिंटनच्या भेटीची मी साक्षीदार होते. म्हणजे मी क्लिंटनला भेटायला वगैरे गेले नव्हते (ना ही मला कुणी त्याना भेटायचे आमंत्रण दिले होते.); पण मलाही असंच वाटत होतं की जणू काही ते मलाच भेटायला आलेत. दररोज संध्याकाळी टीव्ही पुढे क्लिंटन फॅमिलीच्या प्रत्येक क्षणा न क्षणाची बातमी पाहायला मी आवर्जून बसत होते. घरात क्लिंटन, त्याची मुलगी चेलसी, तिचे कपडे, केस, रंग याच्यावर जोरदार चर्चा घडत होती. घरातच काय, सगळ्या गावातही तीच चर्चा सुरु होती. जणू काही क्लिंटन साहेब दिल्लीत नाही, तर आमच्या गावातच आलेत. एवढी उत्सुकता! एवढ कौतुक! असं काय या अध्यक्षांच्या बाबतीत आहे की सगळा देश उत्साहित व्हावा! मी विचारात पडले.
दीडशे वर्षे गोर्या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही? गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे! क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल! पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. "अतिथी देवो भव" ची आपली संस्कृती! आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज! दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा! आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव! आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे?
मग आपण त्यांच्यासाठी काय करावे? पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस! क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.
पण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का? बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का? मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही!'
दीडशे वर्षे गोर्या लोकांच्या वर्चस्वाखाली राहून, आपोआपच त्यांना खुश ठेवायची कला तर आपल्या अंगात भिनली नाही? गोरा साहेब आला, की सगळा कामधंदा सोडून, साहेबाच्या पुढेमागे करायची ही वृत्ती, आपली परंपरागत देन तर नव्हे! क्लिंटनच्या बाबतीत कदाचित ते खर तरी ठरू शकतं, पण ओबामाच्या बाबतीत तर ते ही खर नाही. मग असं वाटतं की गोर्या साहेबामुळे नव्हे, तर ते ज्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्या देशासाठी आपला सगळा देश वेडा होत असेल! पण तसं असेल तर, पाकिस्तानचे मुशर्रफ जेव्हा भारत भेटीला आले तेव्हा आपण त्यांचे एवढे स्वागत करायची काय गरज होती? विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यापाठीमागे एकच पटण्यासारखे कारण असू शकतं. "अतिथी देवो भव" ची आपली संस्कृती! आपल्या अंगावरचे कवच, हीच एकमेव शक्ती, अर्जुनाविरुद्ध युद्ध जिंकायला आपल्याजवळ उरली आहे, हे माहीत असतानाही, स्वतःच्या शरीराची त्वचा काढून देणार्या दानशूर कर्णासारखे आपले पूर्वज! दारात आलेल्या ब्राह्मणाला दिलेला शब्द मोडायचा कसा म्हणून त्याचे तिसरे पाऊल झेलायला, आपलं मस्तक अर्पण करून पाताळात जाणारा बळी राजा! आणि द्धुतात आपले राज्य आणि बायकोही पणाला लावणार्या धर्मराजाचा शब्द मानणारे पांडव! आपली पुराणे या आणि अशाच गोष्टीनी भरलेली आहेत. आपले नशीब बलवत्तर म्हणून आपण लोकशाहीत जन्माला आलो. नाहीतर पाकिस्तानने, आपलं काश्मीर द्धुतात नाहीतर दानात नक्कीच जिंकलं असतं. तात्पर्य काय, की पाहुण्यांना भगवान मानून, त्यांना खुश कसे ठेवायचे, हे आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे?
मग आपण त्यांच्यासाठी काय करावे? पाहुण्यांना ताजमहाल पाहायचा असतो, गांधीजींच्या समाधीला भेट द्यायची असते, उद्योजकांना भेटायचे असते, शाळा-कॉलेजात जायचे असते. यासाठी लागणार्या संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च होत असतील. ओबामा, क्लिंटन साठी आपण ताजमहाल आरामात एक दिवस बंद ठेवतो. अमेरिकेच्या अध्यक्षांना भारतात येऊन नाचायची भारी हौस! क्लिंटन आले, तेव्हा त्यांच्यासाठी, जयपूरच्या शेजारचे एक आख्खे गाव तयार ठेवले होते. गावातल्या बायका, ते येण्याआधी म्हणे तोंडावरचा पदरही काढायला तयार नव्हत्या. पण प्रेसिडेंट क्लिंटनने त्यांच्याबरोबर डान्स केल्यावर, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांची चढाओढ लागली होती. आता ओबामा दाम्पत्याने ही एका शाळेत जाऊन मुलांबरोबर कंबर हलवली होती. दोन्ही अमेरिकन अध्यक्षांच्या भेटीत प्रेक्षणीय स्थळे बघण्यापासून ते नाचण्यापर्यंत खूप साम्य होते. भारताच्या उज्ज्वल परंपरेचा, पाहुणचाराचा आणि प्रेमाचा त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला होता.
पण २००९ मधली पंतप्रधान मनमोहन सिंग यांची US भेट मला आठवली. CNN वर मनमोहन सिंग यांच्या ऐवजी, स्टेट डिनर ला कुणाला आमंत्रित केले आहे आणि त्यांनी कोणत्या डिझायनरचा पोशाख घातला आहे, यावरच जास्त चर्चा चालली होती. टि व्हि वर ना मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमाची चर्चा होत होती, ना सिंग पतीपत्नींनी एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली होती आणि ना ही ते कुठल्यातरी बॉल मध्ये जाऊन नाचले होते. पण जर त्यांनी नायगर्याला किंवा लिंकन मेमोरिअल ला भेट दिली असती, तर अमेरिकेने तो बाकीच्या लोकांसाठी बंद ठेवला असता का? बातम्यांमध्ये त्याचा सविस्तर वृत्तांत दिला असता का? मला आपलं सहजच वाटलं. भारतीय पंतप्रधानांच्या भेटीने, अमेरिकन जनता कोणत्याही प्रकारे उत्साहित, उत्तेजित झाली नव्हती, याचे माझ्या भारतीय मनाला वाईट वाटणे साहजिकच होते. But then maybe that's the difference between the Great and the Good. पण तरीही मला वाटते की अमेरिकेने, ईकॉनॉमी सुधारण्यासाठी आपल्या पंतप्रधानांचा सल्ला घेण्याबरोबरच काही पाहुणचाराचे धडेही घेण्यास हरकत नाही!'
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)